सिंधुदुर्गनगर दि. २१ (जिमाका) : सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनीष दळवी, पी.एम. विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राणे यांनी सांगितले की, गणेशोत्सवासाठी अनेक ठिकाणांहून चाकरमानी जिल्ह्यात येत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपले कर्तव्य असल्याने जिल्ह्याच्या प्रवेश ठिकाणी आणि रेल्वे स्थानकांवर आरोग्य पथकांची नेमणूक करावी.
त्यांनी पुढे सांगितले की, पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवावे, औषधसाठा अपुरी राहू नये, आणि जिल्ह्यातील खड्डे आणि रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा परिषद रस्त्यांची डागडूजी व दुरुस्ती २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी, तसेच काम करताना प्राधान्यक्रम ठरवून कामे पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले.











Leave a Reply