मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करुन आढावा घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वन मंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, मंदा म्हात्रे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
या विमानतळावर जगातील सर्वात जलद ‘बॅग क्लेम’ प्रणाली विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य असावे. सध्या विमानतळाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ६ टक्के काम सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करून पहिले प्रवासी विमान उड्डाण करेल. सध्या सुमारे 13 हजार कर्मचारी येथे कार्यरत असून उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी आणि कोणत्याही परिस्थितीत सप्टेंबर पूर्वी हे काम पूर्ण करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१० जून २०२२ रोजी सिडकोतर्फे १ हजार १६० हेक्टरच्या संपूर्ण जागेवर १०० टक्के प्रवेश आणि मार्गाधिकारासाठी अनुज्ञप्ती नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडला (NMIAL) प्रदान करण्यात आली आहे. सर्व पुनर्वसन पूर्ण झाले आहे. सिडकोने भू-संपादन आणि पुनर्वसनासाठी अंदाजे २ हजार कोटी खर्च केले आहेत.
सिडकोतर्फे १ हजार १६० हेक्टर क्षेत्रामध्ये ५.५ मीटरपर्यंत भूविकास, उलवे नदीचा प्रवाह वळविणे आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थानांतरण, ही विकासपूर्व कामे पूर्ण.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या १ आणि २ टप्प्यामध्ये २० दशलक्ष प्रवासी आणि ०.८ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता आहे, हे विमानतळ सप्टेंबर 2025 मध्ये कार्यान्वित होण्यासाठी सज्ज होत आहे.












Leave a Reply